रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

अभंग!

सुरुचि नाईकने लिहिलेला हा अभंग वाचला आणि क्षणभर असं वाटलं की हा अभंग कुण्या संतांचा आहे की काय? पण नाही..खुद्द तिनेच हा अभंग लिहिलाय...इतकी प्रासादिक रचना पाहून तिला चालही सुचली...तीही अगदी साधी आणि पारंपारिक.


वेढले रे मन गूढ काळोखात
तेजोदीप आत लाभो तुझा

खोल अंतरात कासावीस भान
चरणी तुझ्या ध्यान रुजवी माझे

कोणती वादळे पाहतात वाट
तुझा दे रे हात माझ्या हाती

तुझी माया राहो माझ्या पदरात
तूझ्या स्मरणात जीव माझा

डोळा तुझे रूप,चित्ती तुझे ध्यान
ओठी सदा नाम वसो तुझे

देहाचे गाठोडे,ईप्सीतांचे घडे
अनंताचे कोडे सुटती ऐसे

जाणिला रे संग माझा पांडुरंग
आता रे अभंग अंतरंग

कवयित्री: सुरुचि नाईक

चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: