मंगळवार, १२ मे, २००९

गान समाधी

नागपुरचे तुषार जोशी हे देखिल एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. लेखक/कवी म्हणून त्यांनी भरपूर लेखन केलेय. त्यांची ’गान समाधी’ ही कविता वाचताच लगेच चाल लावाविशी वाटली. आधी मी भैरवीत चाल लावली होती पण का कुणास ठाऊक ह्या कविततेल्या आशयाला ती पूरक वाटली नाही म्हणून मग मी ही दुसरी चाल लावली. ऐकून सांगा कशी वाटतेय ती?

गान समाधी

आलाप असा की नव चैतन्य जागे
तृप्त मनाने गान समाधी लागे

एकेक सूर उजळतो आयुष्याला
आनंद सुरांच्या धावे मागे मागे

मज कुणी नको साथ कराया आता
माझे जगणे तर फक्त सुरांनी भागे

आयुष्याचा रत्न जडित हा शेला
विणतो मी घेऊन सुरांचे धागे

तुषार जोशी, नागपूर

इथे चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: